तुमची भाषा तुम्हाला तुमच्या परंपरा आणि संस्कृतीचा परिचय करून देत असते. तुम्हाला त्या प्रदेशाचे नागरिक म्हणून घडवत असते. आज आम्ही भारताचे सुजाण नागरिक घडवत आहोत कि,अमेरीका आणि इतर तत्सम देशांसाठी नोकर वर्ग तयार करत आहोत?
असा मला प्रश्न मला बरेच दिवसांपासून पडतो आहे.आपल्या भारतीय संस्कृतीची ओळख नसेल तर तिच्याबद्दल त्याला आस्था कशी निर्माण होईल,ही आस्था असणारे नागरिक हवे असतील तर त्यांना आपली संस्कृती माहिती पाहिजे आणि म्हणूनच आपली मातृभाषा अवगत असल्याशिवाय आपली संपुर्ण प्रगती शक्य नाही
No comments:
Post a Comment